Monday, 1 January 2018

भीमा कोरेगाव

विजयस्तंभ (संग्रहीत फोटो)
      भीमा कोरेगाव  येथील झालेल्या दंगलीची बातमी वाचून धक्काच बसला आहे.........खरंच का हा शाहू,फुले,आंबेडरकरांचा महाराष्ट्र आहे..? शिवरायांच्या विचारांचा व त्यांनी घालून दिलेल्या तत्वांचा आहे???कोणताही धर्म असो की जात याचा आदर तो झालाच पाहिजे असे महाराज म्हणत.
        विजयस्तंभ हा लढाईत वीरमरण आलेल्या शुर सैनिकांचा आहे..सैनिकाला कधी कोणती जात ना धर्म असतो .परंतु आपल्या देशाच्या समाजव्यवस्थे  नुसार जाती धर्म आपण पाळतो त्याचे जातन करतो ..अभिमान बाळगतो..त्यानुसारच आपल्या जातीतील सैनिकाने जो काही पराक्रम केला होता त्याचा अभिमान असणारच ..न तो असायला ही हवा...पण काही समाज कंठकांनी एकत्र येऊन ऐतिहासिक असलेल्या जागेवर जावून लाजिरवाणे कृत्य केले.त्याचा निषेध तर झालाच पाहिजे.....अरे समाज विघटकांनो तुम्ही तुमच्या विचारांची आज पातळी दाखवली आहे....आज जी घटना घडली ती लोकशाहीला धक्का देणारी ठरली ..दंगल घडवून आणून तुम्ही जी अराजकता माजवू पाहताय त्याचा काही उपयोग होणार नाही ....तोडा आणि फोडा ही नीती अवलंबुन इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले..तरी सुद्धा अजून अक्कल येत नाही काय.??
       किती बी लावा युक्ती आहे भिमाच्या राज्यघटनेत शक्ती .....आपली लोकशाही इतकीही कमकुवत नाही की चार दोन संजकंठकांमुळे लुळीपांगळी होईल....समाजामध्ये कोणतेही दरी निर्माण आपण करू शकणार नाहीत न आम्ही समाज म्हणून पडू देणार नाही...
  जय हिंद!.....भारत माता की जय......जय भीम ...जय शिवराय.....
                                                               

                                                                 अमोल अवचिते

No comments:

Post a Comment

माधव भंडारी

                  १९८० साला पासुन भाजप चे संघटनात्मक काम करणारेभाजपा चे प्रमुख प्रवक्ते मा. माधव भंडारी  यांची उपेक्षाच.... राजकारणात म...